Showing posts with label Arts. Show all posts
Showing posts with label Arts. Show all posts

Wednesday, April 20, 2022

माझ्या मनाचा स्टोअर रूम

आज काल व्यस्त झालं की फार छान वाटत.ना मनात डोकायची गरज पडत.ना कोणाशी संवाद साधायची.आता आजचं पहा ना . अचानक एकट एकट वाटणं .या पूर्ण जगात जसं मी सोडून कोणीच नाही. शेवटी प्रत्येकाचं मन मोकळं होत असत कुठेतरी, पण मी मात्र कायमच कुलूप लावून ठेवलं आहे. अन् त्याची चावी सुद्धा हरवून दिली. चुकून नाही मुद्दामून .कारण का वेळ द्यावा त्या मनाच्या खोलीत जाण्यासाठी तिथे तर असंख्य जुन्या आठवणी , ते गोड क्षण ,त्या वाईट परिस्थिती आणि अनेक प्रश्नावली धूळ खात पडल्या होत्या.त्यांना साफ तरी कोण करणार.कोणी आहे तरी काय जवळ ? ते साफ करायला नाही ना..!!आणि गेलेच मी साफ करायला तर साफ सफाई पेक्षा जास्त मनाचीच घुसमट होईल त्या जीर्ण गोष्टींमध्ये.

पण काय झाले कुणास ठाऊक.आज ह्या निरव शांततेत दिवस भराच्या धावपळीने ही मला झोप येई ना. शेवटी तरीही त्या मुद्दामून हरवून दिलेल्या चावीला मी शोधून काढलं. अन् मी पुन्हा गेले त्या भूतकाळात जिथे एकेकाळी माझं ही काही वास्तव होत. त्या मनाच्या खोलीत मला खूप काही सापडलं अगदी स्टोअर रूम मध्ये भेटत तसचं काही. पण शेवटी सारच काही जाळ लागून पडलेलं होत. जे काही हाती आल मी सर्वच साफ करत होते.

तिथेच मला माझं बालपण गवसल.हा आता इतक्या दिवस त्या बंद खोलीत राहून थोडंसं धूसर दिसत होत.पण त्या बालपणाचा निरागस भाव अजून ही हृदयाला स्पर्श करत होता.ती शाळा ,ते मित्र मैत्रीण ,ते आईने सांगितलेलं गाणं 
"निंबोळीचा झाडामागे चंद्र झोपला ग बाई " अजून ही कानी गुंजारव करत होत.पण आज कळून चुकल होत की निंबोळीच्या झाडामागे चंद्र कधी झोपतच नव्हता. तो तर रात्रभर जागीच राहायचा. अन् आजीच्या गोष्टीत नेहमी एक आटपाट नगर असायचं.त्या नगरात एक मोठा राजवाडा आणि त्या राजवाड्यात राजा आणि राणी राहायचे. राजा आणि रानीला एक राजकुमार असायचा. त्याला एक राजकुमारी आवडत असायची.इतकंच काय तर शेवटी ते एक ही व्हायचे.पण आजीच्या त्या गोष्टीला खरी स्वीकृती कधी मिळालीच नाही .कारण खऱ्या आयुष्यात  राजकुमार आणि राजकुमारी कधी एक झालेच नाही.त्यांच्यात तर अजून ही जात ,समाज आणि दोघांच्या घरात विरोध असतो.पण तरीही रोज हीच गोष्ट ऐकत आपण आजीच्या मांडीवर एका गाड झोपेत कधी जायचो हे देखील  कळायचं  नाही.

मग मोठ होत जातो. तस तस शाळेत जाणं तिथे रोज खेळणं ,बागडण ,नवीन गोष्टी शिकण,आपल्या मित्र मैत्रिणींसोबत डब्बा खाण, सर्वच मस्त वाटायचं.तरीही ते जग ही मला माझ नाही भासायच. तिथे ही  रोज काहीतरी चुकीचं दिसायचं. म्हणजे पहा ना प्रत्येकाला त्याच्या नुसार नाही तर त्याला मिळणारे गुण किती यावरून त्याची पात्रता ठरवत जात असे.खरचं माणसाचे आचार विचार यांपेक्षा त्याला शिकवण्यात आलेल्या चार गोष्टींवरून त्याला जज तरी का करावं?अजून म्हणायला गेलं तर इतकासा जीव असायचा आणि 4 किलो वजन असलेली बॅग मात्र रोजच खांद्यावर चढायची.वरतून आयुष्यात पंधरा ,सोळा वर्षाचं होई पर्यंत आम्ही हेच ओझ घेऊन चालायचो.पण त्या आयुष्यात ही खूप मौज करण्याची हौस मात्र सर्वांनीच पूर्ण केली असावी.

आता मात्र एक नवीन दुनिया जिथे सारं काही नवीन असायचं. हा आता 15 वर्ष आम्ही जे 4 किलो वजन पाठीवर घेऊन येत राहिलो त्या पेक्षा जास्त अभ्यास इथे असायचा पण तरीही एक वही सोडली तर आमच्या बॅग मध्ये दुसरं काहीच नसायच.मग खरचं त्या छोट्या जीवाला तरी का इतका त्रास असायचा . असो . मग काय रोजची दंगा मस्ती , टपरी वरचा चहा , बस स्टॉप वरची गर्दी अन् शेवटच्या बेंच वरून पहिल्या बेंच वरची जाणारी नजर , तर एक चशमिश टॉपर ला चिडवत राहणं अन् कधी लेक्चर सोडून पळून जाणं, सर्वच काही नित्य नियमच होते. एकेकाळी आपली मुलगी मुलांशी बोलणं न आवडणारे बाबा ही आता खूपच मोकळीक ही देत असे . अन् घरात शांत असणारे सारेच कॉलेज मध्ये वेगळाच attitude मध्ये मिरवत दिसे. पण शेवटी क्षण असाही येतो.जेव्हा सगळेच दूर दूर निघून जातात.एक नवीन प्रवासात स्वतःची ओळख बनवायला सर्वच उडून जात.मात्र त्या गोड आठवणी त्या कॉलेज मध्येच लपून बसतात.

मग आता ही पुढची वर्ष थोडी वेगळीच असतात. जेव्हा घरात सगळे म्हणतात मला मुलगा मुलगी दोन्ही सारखे शेवटी त्याच घरात मुलीचं शिक्षण झालं की कधी तीच लग्न होईल याची खबर सुद्धा नाही लागायची. किंवा ज्यांना वाटायचं आपण आपल्या पायावर उभ राहू.स्वतः जॉब करू ,चांगल्या कामाला लागू , अश्या स्वप्नात जगणाऱ्यांना कधी बाहेर जाऊन दिलं तर ठीक नाहीतर त्यांची स्वप्ने तशीच मोडून जातात . इतकंच काय अचानक एक दिवस आपल्याच कॉलेज मधले एक कपल ने love marriage केलं या पासून तर तो तिला सोडून गेला तर याचा break up झाला अश्या कितीतरी गोष्टी समोर येतात.आणि राहिला प्रश्न टॉपर लोकांचा तर मुलींना आधीच लग्नासाठी जबरदस्ती असते किंवा त्या त्यांची स्वप्न पूर्ण करत असतात आणि मुलांना ही मग चांगले जॉब असतात . आणि मग खरे वळण इथून पुढे चालू होते .

या वळणावर सर्वांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या येऊन पडतात. ते खोडकर वागणारे सर्वच आता matured होऊन वागत असतात.कोणी फॅमिली सांभाळत ,कोणी बिझनेस, कोणी मुल, ,कोणी जॉब ,तर कोणी आई वडील आणि कोणी कोणी तर आज वर आपल्याला कोणतीही उणीव भासू न देणाऱ्या आई वडील यांनाही विचारत नाही.शेवटी त्यांनी केलेल्या प्रेमाची परतफेड ही त्यांना करू वाटत नाही . प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात रमून जात.पण तरीही कोणाची स्वप्न पूर्ण होता कोणाची राहून जातात. अखेर एक दिवस त्याच हातात काठीही येते. अन् आयुष्याच्या त्या शेवटच्या टप्प्यात माणूस जितका वेळ जगतो ते ही फार वेगळच असत. 

कसं ना चार क्षणात माणसाचा जन्म आणि मृत्यू सारंच दोन शब्दात संपून ही गेलं.तरी ही मनात काहूर प्रश्नाचं खरचं आयुष्य इतकं सोपं असतं ? नाही या पेक्षाही काहीतरी वेगळं असतं. फक्त कोणी असं जगत तर कोणी तस जगात.कोणी हसत असत तर कोणी रडत असतं. कोणी सुखात तर कोणी दुःखात.कोणी हास्यमागे अश्रू लपवत तर कोणी अश्रूनांच आपला मित्र बनवत. ह्या भावनेच्या जगात आयुष्य अगदी भरकटत असत. आणि अश्या आयुष्यात जगताना प्रत्येकाला वाटत की हसू असो किंवा अश्रू ,सुख असो किंवा दुःख , या मनाला सावरता यावं ,त्याचा तोल सांभाळता यावा ,आणि या सर्व पैलुंशी एकरूप ,एकनिष्ठ व्हावं. तेवढ्यात अचानक कोणीतरी येऊन मला जवळ घेतलं .मी अचानक घाबरले .पाहिलं तर आई आली होती.मी अजून झोपली नाही म्हणून तिने झोपायला सांगून लाईट बंद करून गेली. अन् लाईट बंद होताच  एवढ्या दिवसांनंतर उघडलेल्या माझ्या मनाच्या खोलीला मी पुन्हा एक कुलूप लावलं. आणि आज ती चावी मी माझ्याच जवळ ठेवली.कोणी मागितली तरी कोणाला ती देयची नाही.कारण त्यातली आठवणींची धूळ आणि भावनांना आलेलं जाळ माझ्याशिवाय कोणाला साफ करता येणारच नाही. कदाचित आज माझी ही आसवे वाहत होती.पण मला सोडून इतर कोणाला ते जाणवलं नाही. अन् ती आसवे गळत असताना मी कधी झोपून गेले कळलेच नाही.फक्त ती आसवे दुःखाची नव्हती तर ती आसवे होती माझ्या मनाला आज कवटाळून भेटलेल्या माझ्या मनाची जी आयुष्य जगायला शिकवत होती. अन् माझ्याशी संवाद साधत होती .आता पुन्हा जेव्हा हे कुलूप पुन्हा उघडेल तेव्हा पुन्हा एकदा या मनाच्या स्टोअर रूम मध्ये नक्की या माझ्यासोबत.

(माझ्या मनाचा स्टोअर रूम ...कसा आहे नक्की कळवा.😊)

Sunday, March 7, 2021

महिला दिवस कधी साजरा करावा...?????


महिला दिवस कधी साजरा करावा..???


ती असो / मी असो किंवा कोणतीही स्त्री असो ही अशीच असते.प्रत्येक गोष्टीत ती सक्षम,धीट,स्थिर आणि चंचल असते.प्रसंगी ती लढू शकते,मन मारून जगू ही शकते आणि स्वप्न स्वतःची पूर्ण करण्यासाठी जिद्दिही ती बनू शकते..
मोकळ्या आभाळी उडू शकते ,खूप काही सहन करूनही खूप काही साकार करू शकते..

पण हे एवढं लिहून तर कोणीही म्हणेल ," जागतिक  महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"...
पण खरचं एवढं लिहून होतो का हा दिन साजरा..?


प्रश्न वाचून नक्कीच गोंधळात पडले असतील काही जण.की जर 8 मार्च हा अगोदरच जागतिक महिला दिवस म्हणून साजरी केला जातो तर " महिला दिवस केव्हा साजरी करावा ?" हा प्रश्न मी का विचारतेय.कारण मला अस वाटत की जर महिलांना त्यांच्या आयुष्यात त्यांना हवं ते करता येत नसेल ,त्यांची स्वप्न पूर्ण करता येत नसतील,त्यांना हीन वागणूक दिली जात असेल , भ्रूणहत्या, लेंगिक शोषण ,acidic हल्ला ,छेडछाड ,शिक्षण वंचित ,बलात्कार या गोष्टींना समोर जाव लागत असेल तर मग हा महिला दिवस साजरी करून काय उपयोग..???

कारण इथे प्रत्येकाला जगण्याचं काही करून दाखवण्याचं स्वातंत्र्य आहे .मग मुलींना,स्त्रियांना का नाही...????
 तुम्ही म्हणाल की आम्ही तर प्रसंगी त्यांचे कौतुक करतो,त्यांना मान देतो, कोणावर बलात्कार झाला तर मेणबत्ती लावून फिरतो,भ्रूणहत्या झाली की मोठ मोठ नारे लावतो,कोणी देशाचा गौरव वाढवला तर रोज त्या गोष्टीची विचारणा करतो.

पण मग त्यावेळी हे जग कुठे असत जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात.खरचं सांगा ना की फक्त सर्व प्रकार घडून गेल्यावरच लोकांना,समाजाला आणि सरकारला जाग येत असते.विषय फार गंभीर तेने मांडते आहे अस नाही पण जर इथे मी सुरक्षित आहे अस म्हणण्याची खात्रीच मुलींना नाही तर मग खरचं हा दिवस साजरा करण्यात काही तथ्य आहे का..??


मला तरी नाही वाटत..
कारण फक्त एक दिवस स्त्रियांची थोरवी सांगून तर महिला दिवस नाही साजरा होऊ शकत ना..!!!

उलट 
जेव्हा या जगात एकही "निर्भया" जन्म घेणार नाही...
एकही "प्रियांका" जळणार नाही...
पाच वर्षाच्या "नंदिनी" प्रमाणे बलात्कार ने आपला जीव गमवणार नाही...

जेव्हा छपक सारखी " लक्ष्मी अग्रवाल " एका सिनेमात दाखवण्याची गरज पडणार नाही...
जन्म घेण्या आधीच आईच्या गर्भात एखाद्या मुलीची भ्रूणहत्या थांबणार नाही...
प्रत्येक मुलीला शिक्षण घेण्यासाठी रोखले जाणार नाही...

जेव्हा या जगात good touch and bad touch काय असत.हे मुलींना शिकवण्याची गरज पडणार नाही..
मासिक पाळीचा वेळी त्यांना हीन वागणूक मिळणार नाही,
की इथेच उठाव तिथेच बसावं हेच करावं, मंदिरात नाही जाव...
जेव्हा रस्त्याने चालताना कोणाची भर रस्त्यात छेड काढली जाणार नाही..

जेव्हा अकारण लादले जाणारे बंधन मोडणार नाही...
जेव्हा स्वतःच अस्तित्व बनवायला त्यांना रोखले जाणार नाही...
जेव्हा त्यांचा स्वाभिमान ,इज्जत ,प्रतिष्ठा या एकही गोष्टीला ठेच लागणार नाही...

जेव्हा साधं पाच मिनिटे घरी यायला उशीर झाला तरी तिला थबकावे लागणार नाही
अन् बाहेर पडताना तिला हातात paper spray घेऊन हिंडण्याची गरज पडणार नाही
आणि जेव्हा एका मुलीलाच पाऊल घेऊन माझ्यासारखं  स्त्रियांसाठी या गोष्टी तिच्या लेखांमधून मांडण्याची गरज पडणार नाही

तोपर्यंत तरी जागतिक महिला दिवस हा नावापुरताच आहे अस वाटत.
कारण एक दिवस महिलांना पुजायच आणि नंतर त्यांनाच नको नको त्या गोष्टीत अडकवून ठेवायचं यालाच तुम्ही महिलांचा गौरव मानत असाल तर हा 8 मार्च फक्त कॅलेंडर मध्ये पहावा एक वर्षाची तारीख म्हणून 
अन् तरच हा महिला दिवस साजरी करावा उद्या पुन्हा त्यांना दुय्यम स्थान देणार म्हणून

हो माहिती आहे की या जगात स्थान आहे मुलींना 
कौतुक सुद्धा होत त्यांचा लढा पाहून
आणि विरतेची गोष्ट ही सांगण्यात येते तिची सर्वांना

पण अजून हि भरपूर गोष्टी आहे ज्या त्या सहन करतात.
अजून ही भरपूर बंधनात त्यांना अकारण अडकवले जाते.
अनेक गोष्टींसाठी त्यांना लढावे लागते.
म्हणून जर या गोष्टी आपण बदलू शकत असू तरच तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏
 


तुम्हाला काय वाटतं जे लीहल ते योग्य आहे का...???
कारण आपण लिहितो ती गोष्ट प्रत्येकाला पटेलच असे नाही.पण खरचं महिला दिवस कधी साजरा करावा..???या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का...???
कॉमेंट मध्ये नक्की कळवा..👍🙏🙏









Sunday, February 21, 2021

हवीहवीशी ती खिडकी...

हवीहवीशी ती खिडकी....


रोज एक सूर्याची कोवळी किरण डोळयांवर आल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही.तर त्या झोपेतील स्वप्नातून वास्तवी जगात आणते ती म्हणजे खिडकी.फक्त जागवतच नाही तर आपल्या प्रत्येक क्षणात ती आपली सोबती असते.याच खिडकी बद्दल थोडस बोलण्याचा प्रयत्न... 

कधी कधी वाटत या खिडकीत बसून पहाव ते निळेभोर आकाश,वाटत थोडस पळाव त्या ढगांच्या वरतून,वाटत मी आपणही उडाव त्या पक्षांच्या थव्यात अन् विसरून जाव जग सार.पण ते वाटण फक्त खिडकीतून पहाव लागत.तिथंच मन मोकळं करावस वाटत.पण खरंच एवढच असत या खिडकीत.??नाही ,तर मग नक्की काय दडलय इथे.???

इथे दडलाय मनाचा मोकळेपणा, सळसळणारा वारा,जीवनाला हवी असते ती शांतता अन् अजून बरंच काही.पुन्हा नवीन पिढीसाठी सांगायच झाल तर दिवसाच 4G net संपवायची जागा असते खिडकी,टिक टॉक व्हिडिओचे परफेक्ट लोकेशन असते खिडकी.instagramचे reel पाहण्याची जागा असते खिडकी.


एवढच काय तर "मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद का टूकडा "दाखवणारी खिडकी. आजारी पडल्यावर बाहेर पाय टाकता येत नाही पण त्यात सुद्धा आपल्या मित्रांचा बोलबाला कानांपर्यंत पोहचवते ही खिडकी. अजून विचार केला तर सध्याच्या काळात कोरोनाशी लढताना घरात बसून बाहेरच जग दाखवते ती खिडकी....

सकाळच्या वेळी चहा पिण्याची जागा असते खिडकी,कधी एकटयात आठवणीं ताज्या करते ही खिडकी,कधी रडताना धीर देते ती खिडकी तसंच मनमोकळं हसायला शिकवते ती खिडकी. भरकटलेल्या आयुष्यात स्वतःसाठी जगणं शिकवते ती खिडकी. पक्षांचा किलबिलाट कानावर टाकते ती खिडकी. एखादा कवी ,लेखक ,चित्रकार यांना हवी असणारी शांत जागा  असते खिडकी जी निर्माण करते नवीन साहित्य,नवीन रूपात,नवीन लेखक,नवीन गायक,नवीन चित्र, नवा चित्रकार अन् बरंच काही....



या खिडकीच नात प्रवासात सुद्धा खुलून येत .कधी विमानात बसून ढगांशी आपली मैत्री जमवते ही खिडकी तर कधी रेल्वेतून पळणारी झाडे दाखवते ही खिडकी.बसमधली विंडोची सीटसुद्धा मिळवायला आपली वेगळीच धडपड असते.कारण ती खिडकी आपल्याला दाखवते संथ वाहणारी नदी जी नैहमी सांगते वाहत जाव झऱ्यासारखं दुसऱ्याच होऊन जगण्यासाठी,वाहत जाव माझासारखं दुसऱ्याला जीवन देण्यासाठी....

उन्हाळयात सळसळणारा थंड गारवा देते ही खिडकी,पावसात हातांवर पडणारा एक एक थेंब वेगळाच अनु्भव देते.टपटप पडणारा तो पाऊस भिजवत नाही पण मनात नेहमी बरसतंच असतो.गुलाबी त्या थंडीमधे प्रेमाला नवीन वळण देते ही खिडकी.मग अस वाटत ही खिडकी आहे की ऋतूंप्रमाणे बदलणारी ,आपल्याला हवी असणारी एक मैत्रीण.

कधी कधी इच्छा असते ,मस्त खिडकीत बसून कानात हेडफोन घालून गाणे एकावे.कधी वाटत रात्री झोप  नाही आली तर इथेच येऊन आकाशात पहाव . चांदण मोजाव.त्या चंद्राशी बोलाव.कधी वाटत कुणासोबत वेळ घालवण्यापेक्षा येऊन बसाव या, खिडकीत,रमून जाव आपल्याच जगात,वाटत डोकून पहाव आपल्या मनात ,स्वतःशीच बोलाव थोडस मोकळेपणाने,एकटयातच हसावं मनभरून, वाटेल तसं वावराव...

तर अशी ही खिडकी जी नेहमी आपली साथ देते. आपल्याशी मैत्री करते.कधी खळखळून हसवते,कधी कधी मनमोकळ रडवते,नवीन स्वप्ने दाखवते,आपल्या मनात घर करते अन् नेहमी आपलीच बनून राहते.आपल वेगळंच विश्व निर्माण करते.म्हणूनच

हवीहवीशी ती खिडकी माझा विश्वात रमणारी
हवीहवीशी ती खिडकी माझी होऊन जगणारी
माझी होऊन जगणारी.......


तुम्हाला ही काही आठवत असेलच ना खिडकी जवळ गेल्यावर...तर मग आज मनमोकळ करून बोला थोडंस तुम्हाला आवडणाऱ्या खिडकीबद्दल......👍


Tuesday, February 16, 2021

शेवटी युद्ध आपणच जिंकतो...👍

शेवटी युद्ध आपणच जिंकतो....👍


खुप काही स्वप्न असता , खुप काही ईच्छा असता

पण त्यांना अटी सुद्धा एवढ्या असता , की स्वप्न काय अन् ईच्छा काय..

सर्व तिथेच लोप पावता


मग हातात उरत काहीच नसत , मनाला काही सुचत नसत

डोळ्यात खूप साठून जात , अन् पुन्हा मग ते वाहू लागत


वाहता वाहता पुर येतो , सर्व जणू उध्वस्त करतो

ओरडून ओरडून आपण थकतो , पण आवाज कोणी ऐकत नसतो


पण तिथेच कोणी मरत नसत , थोड लढण बाकी असत

कारण जे अस्तित्व असत, ते हारण तरी शिकवत नसत


मग वेळ अस्तित्व जपायला सांगते , तिमिरात एक कंदील मिळते

थोड अंधुक पण स्पष्ट दिसत , अन् मन पुन्हा घट्ट होत


मग अचानक खूप हिम्मत येते , मनात खूप जिद्द पेटते

अवघड वळण सोपे दिसते , आपलेच स्वतःहून कुतूहल वाटते


क्षण क्षण आपण लढतो , इच्छांना नवा उजाळा देतो

स्वप्नांना आपल्या विसावा मिळतो ,अन् सर्वच काही साकार करतो


मग काहीही झाले जीवनामध्ये ,आपण आता रडत नसतो

घडतंय त्त्याच्याशी युद्ध करतो,अन् शेवटी युद्ध आपणच जिंकतो....

शेवटी युद्ध आपणच जिंकतो....👍


(

👆👆ही माझी कविता जी मला कधीच मला हरवत नाही.तर नेहमीच नवीन स्वप्न दाखवते,त्यांना पूर्ण करण्यासाठी जिद्द देते .😊

तुम्हाला कविता कशी वाटली नक्की कळवा....👍)


Saturday, February 13, 2021

तुला का हवी साथ कुणाची...???

 

तुला का हवी साथ कुणाची...???





आज सहज सर्व कामातून थोडा वेळ माझ्यासाठी काढून मी  घरा शेजरच्या बागेत फिरायला गेले.त्या थंडगार, शांत वातावरणात फार प्रसन्न वाटत होत.वाटल बर झाल की आज थोडा वेळ सवतःला मिळाला.मी तिथे फार रमून गेले
आणि फिरून झाल्यावर असेच बागेतील बाकड्यावर बसले होते.पाहिलं तर तिथे एक मुलगा एका मुलीला गुलाब देऊन म्हणत होता "Happy Rose Day 🌹🌹🌹"
अन् ते शब्द ऐकून मी माझ्या मनाशी पुटपुटले " आज Rose Day आहे वाटत".त्यांना पाहून वाटल अरे खरचं आयुष्य एवढं सुंदर बनत का कोणी साथ दिली तर...???

आणि मनाने उत्तर दिलं की हो बनत ही असेल.कारण प्रत्येकाला कोणाची ना कोणाची गरज असतेच की. जस झाडाला गरज असते पाण्याची,श्वास घ्यायला गरज असते oxygen ची,कवीला गरज असते शब्दांची , चित्रकाराला  गरज असते रंगांची,ज्योतीला गरज असते समईची, तसचं माणसाला गरज असते माणसाची.पण मग त्या व्यक्तीचं काय जी एकटीच आहे. स्वतः चे सुख,दुःख,आनंद ती व्यक्ती कोणासोबत share करणार...???

मग घरी येऊन असच लिहीत असताना पुन्हा तो प्रसंग आठवला अन् मनाला प्रश्न विचारावा  वाटला, की खरचं आयुष्याला का हवी साथ कुणाची...???

मग पूर्ण मन गुंग झाले अन् हा एक विचार मनात घोळू लागला.एक एक शब्द ,एक एक ओळ लिहू लागले.अन् नकळत मनाने एवढे लिहिले की न रहवता मी सर्व काही टाईप करू लागली.आणि जे मला वाटल ते सहज monitor च्या screen वर डोळ्यांना दिसू लागलं. मग एक प्रश्न मी स्वतः ला केला आणि उत्तर ही त्याच मीच दिलं...


खरचं आहे का मला गरज या आयुष्यात कुणाची..??
कोणी सोबत असण्याची,
कोणी माझे हट्ट पुरवण्याची..??
कोणी पावलो पावली सोबत चालण्याची...???
कोणी मला धीर देण्याची...???

तर माझं उत्तर आहे नाही.अजिबात नाही.हो हो बरोबर ऐकल तुम्ही अजिबात नाही.उत्तर ऐकून आश्चर्य वाटल का..?? पण ह्या उत्तराला कारण ही समर्पक आहेच.म्हणून माझ उत्तर तरी नाहीच आहे..

हा माहितीय मला
खूप सारे problems, खूप सारे संकट आहे माझ्या आयुष्यात , पण त्या संकटांना तोंड देणं मला जमतच ना
हो आहेत माझ्या आयुष्यात खूप सारे दुःख ,खूप सारे sadness पण  सुख म्हणजे नक्की काय असत,हे त्या दुःखातून च मी शिकते ना
हो रडते मी कधी कधी आणि फक्त रडत नाही तर खूप खूप रडते पण रडता रडता स्वतः ला मीच सावरते ना

खूप साऱ्या चुकाही होतात माझ्याकडून पण त्या चुका वेळेवर ही मीच सुधारते ना
हा असतील माझ्यावर अनेक बंधने,अनेक restrictions असतील पण जी बंधने योग्य आहे तेव्हढीच मी पाळते ना अन् जी बंधने योग्य नाही त्यांना ही मीच मोडते ना
हो घाबरते सुद्धा मी या आयुष्यात येणाऱ्या अनेक लोकांना
पण कोणाला ही न कळता त्यांच्याशी ही लढतेच ना

हो नसतील होत माझे काही स्वप्न पूर्ण,राहत असतील माझे dreams अपूर्ण पण त्या स्वप्नांना अस्तित्वात मी  साकारते च ना
हा दिसत मला इथे प्रत्येक गोष्ट की कोण काय करतंय,कोण कसं वागतोय पण माझ्या जागेवर मी 100 टक्के योग्य आहे ,हे पण मला समजतच ना
हा वेळ आली की काही प्रसंग फार त्रास ही देतात मला ,tension ,depression सर्वच घेऊन येतात मला पण त्यात खंबीर वागणे मला तरी येतेच ना

हो नसेल कळत मला कोणता रस्ता बरोबर आहे पण वाट माझी चुकली तर मी नवीन रस्ता निर्माण करते
हो आहेत अपेक्षा भरपूर माझ्या ,पण दुसऱ्याकडून मी अपेक्षा कुठे करते ,आहे ते फक्त स्वतः मनाने पूर्ण करते
हो पडत असेल मी दहावेळा पण जिद्दीने पुन्हा उभी ही होते
मदत कुणाची न घेता

हो नसेल मी perfect इथे,असेल मी खूप simple, नसेल कळत मला जगाच्या गोष्टी पण कोणीच perfect  नाही इथे हे पण मी जाणते च ना
सगळे म्हणत ही असतील ही म्हणजे impossible पण ते I am possible म्हणून मीच बदल घडवते ना
होतात कधी कधी वाईट गोष्टी माझ्या सोबत पण वाईट अनुभव आठवणीत घेऊन मी आयुष्य सुंदर करतेच ना

मग एवढा धीर मी स्वतः ला देते,
एवढी मला मी ओळखते,
इतके प्रेम स्वतः वर करते,
मग का हवी मला साथ कुणाची
जर हवं ते सर्व मी माझ्यासाठी करते
प्रसंगी आनंदी असते
नेहमी मनाला साथ देते
मग का हवी मला साथ कुणाची
दुःखातून सुख मिळवते
वाईट गोष्टी बाजूला सारते
अन् रडता रडता हसणे शिकते
मग का हवी मला साथ कुणाची
का हवी मला साथ कुणाची

जर एवढं मी स्वतः ला जाणते
तर मग नको मला गुलाब कोणाकडून जर  आयुष्यात माझ्या  मी सुगंध पसरवते
नको मला चॉकलेट कोणाकडून जर मीच माझ्या आयुष्यात  गोडवा निर्माण करते
नको मला एकही teddy जर teddy एवढं सुंदर विश्व माझे मी तयार करते
नको मला promise कोणाचं आयुष्यभर मला साथ देण्याचे जर मीच माझा धीर होते
नको मला एक मिठी कोणाची जर मी रडताना मीच माझा खांदा बनते
अन् नको मला व्हॅलेंटाईन आयुष्यात जर मीच स्वतः ची व्हॅलेंटाईन बनते





हे जग आहे ना,जो घाबरतो त्याला अजून घाबरवत.जो रडतो त्याला अजून रडवते,जो दुःखी असतो त्याला अजून दुःखी करतो मग त्यापेक्षा आपणच मनाला आपल्या ओळखून स्वतः ला धीर दया.

आजचा हा लेख प्रत्येक त्या मुलीसाठी जी म्हणते की या जगात मी एकटी आहे. माझे असे कुणीच नाही.खरतर या जगात कुणीच एकट नसत.कारण प्रत्येकाला मन असत जे आपल्या भावना समजून घेत.प्रसंगी सावरत.थोडंसं घाबरत पण खूप धीट ही असत.कधी कधी खूप रडत पण हळुवार आपल्याला हसवत.म्हणून कधीच स्वतः ला एकट नका मानू.तुमच्या मनाच्या आधाराने पुढे जात रहा.ते कधीच तुम्हाला सोडणार नाही.काही वाईट होऊन देणार नाही.नेहमी तुम्हालाच साथ देणार.तुमच्या स्वप्नांना,इच्छांना बळ देणार.तुम्हाला यशाच्या शिखरा वर पोहण्यास मदत करणार.

म्हणून स्वतः वर प्रेम करा💖💖स्वतः स्वतःचे व्हॅलेंटाईन बना✌️✌️तुम्हाला हवं ते करा🤩🤩आणि स्वतः ला आनंदी ठेवा💖💖
म्हणून माझ तर प्रेम आहे स्वतः वर.
आणि तुमचं कोणावर स्वतः वर की तुम्हाला हवी साथ कुणाची ?????....नक्की कळवा.....👍


सागराच पाणी खार का आहे?

माणसामाणसातील वाद ऐकले असतील पण कधी लाट आणि किनाऱ्यातील वाद  ऐकला आहे का? जर वाद होत असतील ना, तर जिंकत नेहमी किनारा असावा. कारण आजन्म ती ला...